Ad will apear here
Next
‘सजीवांच्या अभ्यासात जैवमाहितीशास्त्र महत्त्वपूर्ण’
पुणे : ‘सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती भरलेली आहे. स्थायी, द्रव स्वरूपात शरीराची रचना असून, त्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन आहे. विविध पेशी, बॅक्टेरिया आणि जैविक घटक शरीरामध्ये आहेत. सजीवांच्या या अभ्यासासाठी जैवमाहितीशास्त्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवमाहितीशास्त्र केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता सावंत यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर ‘जैवमाहितीशास्त्र : सजीवांच्या माहितीचा शोध आणि बोध’ या विषयावर त्या बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात भरलेल्या या वैज्ञानिक कट्टयावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, ‘एमकेसीएल’चे प्रमुख डॉ. विवेक सावंत, सरव्यवस्थापक उदय पांचपोर, विज्ञानशोधिकेचे संदीप नाटेकर आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाल्या, ‘डीएनएसारख्या तंत्रामुळे अनेक गुन्हे, माहिती उघडीस आणली जाते. त्याशिवाय बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट), फॉरेन्सिक चाचणी यामुळे किचकट गोष्टींचा उलगडा होतो. वांशिक माहिती घेण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शरीराचे, स्वभावाचे गुणधर्म ओळखण्यासाठी, कठीण कोडी उलगडण्यासाठी, व्यक्तिसापेक्ष उपचारांसाठी जैवमाहितीशास्त्र क्रांतिकारी ठरत आहे.’

यासह एखाद्या औषधाचे विपरीत परिणाम कसे होतात, बॅक्टेरियाचे चांगले आणि वाईट गुणधर्म, फॉरेन्सिक तपासणी कशी शक्य होते, धानाच्या काही जाती दुष्काळाचा सामना करू शकतात, तर काही करू शकत नाहीत, असे का, अशा अनेक प्रश्नांवर या वेळी चर्चा झाली. त्यासाठी बहुशाखांच्या एकत्रीकरणाचा कसा उपयोग होतो, यावरही उहापोह झाला. विनय र. र. यांनी मनोगत व्यक्त केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZJABQ
Similar Posts
‘कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे’ पुणे : आपण जसे क्षमतेपलीकडे काम करू शकत नाही, तसेच निसर्गाचेही आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता पुढ्च्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा.
‘कष्टाऐवजी बुद्धीच्या कामांना प्राधान्य’ पुणे : ​‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापराने आज अनेक उपकरणे विकसित होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारी ही उपकरणे भविष्यात माणसाचे आयुर्मान वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अवघड आणि अशक्य कामे रोबोटकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे माणसाला यापुढे कष्टाची नाही, तर बुद्धीची कामे करण्याला प्राधान्य
‘रासायनिक अभियांत्रिकीमुळे दैनंदिन जीवन सुकर’ पुणे : ‘आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यामध्ये रासायनिक अभियांत्रिकीचा मोठा वापर केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रात तात्काळ आराम देणाऱ्या वेदनारहित औषधांमध्येही प्रभावी रसायने वापरली जातात. त्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन अधिक सुकर होत आहे,’ असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ
वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. रत्नदीप जोशी पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रत्नदीप जोशी या कट्ट्यावर येणार असून, ‘दैनंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language